Posts

Showing posts from 2020

"२६/११ कसाब आणि मी" - BOOK REVIEW

Image
          26/11 .... मुंबईकरांसाठी काळा दिवस... या आठवणी मनाच्या कोपऱ्यात डोकवल्या तरी डोक्यात मुंग्या आल्याशिवाय राहत नाही. डोक्याच्या शिरा आपोआप ताणल्या जातात. शरीराचा एकूण एक अवयव पेटून उठतो. नुसता राग राग आणि राग येतो. पोटात गोळा येतो. मन अजूनही कुठेतरी घाबरतं. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. सूडाची भावना जागी होते. मग मनात सुरू होतो प्रतिशोध.....हो ना ??? पण शांत व्हा. आपण २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत अतिरेकी कसाबला फासावर चढवण्यात आपलं पोलीस दल यशस्वी झालं आहे.     या दहशतवादी हल्ल्याचा तपासाचा अनुभव लेखक रमेश महाले यांनी "२६/११ कसाब आणि मी" या पुस्तकात मांडला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने या घटनेतील अनेक बारकावे समोर येतात.    ही घटना घडत असताना सामान्य माणसापासून ते रेल्वे कर्मचारी, रहिवासी, पोलीस अधिकारी, शिपाई, हवालदार या सगळ्यांनी आपल्या देशाप्रती कर्तव्य चोखपणे पार पाडलं. जीवावर उदार होऊन अनेकांनी नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. आणि स्वत : चे प्राण दिले ही.   काही घटना कदाचित वृत्...
Image
                   हम्पी मैं आपका स्वागत हैं!                                    (भाग 2-3)         ट्रीपचा दुसरा दिवस लवकरच सुरू करायचा म्हणून लवकरच झोपलो. कधी ऑफिसला लवकर न उठणाऱ्या आम्ही तिघी सकाळी 5 वाजताच उठलो. आज सकाळी विठ्ठल मंदिरात जायचं होतं. हम्पीमधलं पर्यटकांचं सर्वाधिक आकर्षक असलेलं पर्यटन स्थळ...विठ्ठल मंदिर. सहाजिकच आमचंही. विठ्ठल मंदिर हे फोटोजेनीक ठिकाण असल्याने आणि सकाळच्या वेळेस पर्यटकही कमी असतील म्हणून सकाळच्या वेळेस जाण्याचं ठरवलं.      तुंगभद्रा नदीच्या किनारी वसलेल्या विठ्ठल मंदिरात ५६ खांब आहे. या खांबातून संगीत ऐकू येत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.        मंदिराचे बांधकाम राजा कृष्णदेवराय यांच्या कारकीर्दीत पूर्ण झाल्याची माहिती मिळते. या मंदिरात एक रथ, तुळशी वृदांवन, म्युझिकल पिलर तर मंदिराच्या मंडपात विष्णुचे अवतार कोरलेले पहायला मिळतात. ह...
Image
            हम्पी मैं आपका स्वागत हैं !!!   ( भाग - 1-3)                  हम्पी... कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातील अगदी छोटसं गाव. गाव छोटसं असलं तरी या गावात पाहण्यासारखं आणि घेण्यासारखं (जगण्याच्या दृष्टीने) बरंच काही आहे.     Hampi, Karanataka.                                                      हनुमानाचा जन्म याच गावात झाल्याने हनुमान, प्रभू श्रीराम यांच्याविषयी लोकांच्या मनात विशेष स्थान आहे. या गावात पोहचताच तुम्हाला बहुतेकजण भगव्या रंगाची कपडे परिधान केलेले दिसतील. आम्हालाही हे सगळं नवीन होतं. म्हणून  रिक्षावाल्या काकांना विचारलं. इथे लोक हनुमानाची विशेष पूजा करतात. साकडं घालतात. भगव्या रंगाचं शर्ट आणि लुंगी ३ महिने, वर्षभर घालू ; आमच्या पारड्यात तुझ्या कृपेची फुलं टाकण्याचा नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर ही कपडे नदीत वि...